Posts

Showing posts from September, 2025

२१ दुर्वांचे श्रीगणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य

Image
२१ दुर्वांचे श्रीगणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य गणांचा अधिपती गणपती.  हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात.  गणपती विघ्नहर्ता आहे.  गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात.  यामुळे गणपती प्रसन्न होतो.  गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत.  एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे.  ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती.  अनल अर्थात अग्नी.  देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले.  यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली.  तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या.  आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली.  त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे ग...

सामूहिक पोथी वाचन

Image
सामूहिक पोथी वाचनाचा फायदा (Benefits of Group Sacred Text Chanting): सामूहिकरित्या पोथी वाचन करणे म्हणजे एकाच वेळी, एका ठिकाणी अनेक लोकांनी श्रद्धेने आणि मनोभावे धार्मिक ग्रंथाचे (उदा. श्रीरामरक्षा स्तोत्र, श्री दत्तबावनी, श्री विष्णुसहस्रनाम, हरिपाठ, एकनाथी भागवत, इत्यादी) पठण करणे. अशा प्रकारच्या सामूहिक वाचनाचे आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक फायदे खूप आहेत. खाली त्याचे काही महत्त्वाचे फायदे दिले आहेत: 🌼 आध्यात्मिक फायदे: शक्तिशाली आध्यात्मिक वातावरण निर्माण होते.  अनेक लोक एकत्र येऊन उच्चारलेल्या मंत्रांची कंपनं (vibrations) जागेला शुद्ध करतात.  संकल्पपूर्तीला बळ मिळते.  सामूहिक प्रार्थना आणि वाचनामुळे संकल्प सिद्ध होण्याची शक्यता अधिक असते.  पुण्यसंचय होतो.  समूहाने केलेले नामस्मरण किंवा ग्रंथ वाचन हे अधिक पुण्यदायक मानले जाते.  देवत्व जागृत होते.  एकत्र वाचनामुळे त्या ग्रंथातील देवतेचा प्रभाव त्या जागी प्रकट होतो. 🧘‍♂ मानसिक व भावनिक फायदे: मन शांत होते, चिंतन वाढते सामूहिक वाचनामुळे मनाचा स्थैर्य आणि समाधान वाढते. नकारात्मक विचारांचा नाश होतो प...

वैज्ञानिकदृष्ट्या झोपेची दिशा

Image
🟡 वास्तूनुसार झोपण्याच्या सर्वोत्तम दिशा - ऑफिसमधला ताण किंवा घरातील भांडण यासाठी तुम्हाला दोष द्यायचा असला तरी वास्तूनुसार झोपण्याची चुकीची स्थिती दोषी ठरू शकते. 🟡 होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे! 🟡 तुमच्या डोक्याची स्थिती किंवा झोपण्याची दिशा तुमच्या झोपेशी संबंधित सर्व समस्यांचे कारण असू शकते. 🟡 वास्तुशास्त्राच्या शास्त्रानुसार, तुमचे डोके कोणत्या दिशेकडे असते ते तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण ठरवू शकते . आणि वास्तूनुसार तुमच्या झोपण्याच्या दिशा आणि तुमच्या आरोग्याचा थेट संबंध आहे . 🟡वास्तूनुसार झोपण्याच्या दिशेचे महत्त्व - 🟡वास्तूनुसार झोपेची दिशा  व्यक्तींच्या एकूण झोपेची गुणवत्ता आणि आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 🟡 वास्तू अनुरूप फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुम्ही  करोडो  मध्ये पैसा खर्च केला असला तरीही , तुम्ही शांतपणे झोपू शकत नसाल तर काही फायदा नाही. 🟡 आपण आपल्या जीवनात करत असलेल्या सर्वात महत्वाच्या आणि आवश्यक क्रियाकलापांपैकी एक म्हणजे झोप. सरासरी, बहुतेक लोकांच्या आयुष्यापैकी एक तृतीयांश झोपेत व्यतीत होते. 🟡चांगली झोप आपल्याला फक्त ताजेतवाने आ...

श्रीसूक्त फलश्रुति

 येथे श्रीसूक्ताच्या फलश्रुति बद्दल विवेचन आहे ते शांतपणे तन्मयताने वाचा; की लक्ष्मी म्हणजे काय कळेल:- वाचनात आलेलं छानसं, मार्मिक आणि बुद्धीला चालना देणारे असे काही तरी... 👇👇👇👇👇👇👇👇👇 आम्हाला वेद शिकवले नाही, आम्हाला उपनिषदे शिकवले नाहीत म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून, समजून घेण्याचा प्रयत्न करतात?  म्हणून आज जे ७००० वर्षांपूर्वी सांगितलं ते आज मितीला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील श्री सुक्तामधून पाहू.  ज्यांना यातून आपल्या संस्कृतीचा बोध घ्यायचा ते घेतील आणि आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याचा अभिमान सुद्धा बाळगतील. श्री सूक्तामधील फलश्रुती मधील दहाव्या श्लोकात  ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् असं म्हंटलेलं आहे. म्हणजे काय तर महालक्ष्म्यै च विद्महे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे कशासाठी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो, सन्मार्गावर चालण्याची बुध्दी देवो आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्रीसुक्त हा आधार आ...

कुंडलीतील बारा भाव

Image
कुंडलीतील बारा भाव जन्मपत्रिकेचे बारा भाग पडलेले आहेत त्यांना भाव किंवा स्थान असे म्हणता येईल प्रथम भाव.. लग्न स्थान तनुस्थान द्वितीय भाव.. धनस्थान तृतीय भाव.. पराक्रम स्थान चतुर्थ भाव.. सुखस्थान पंचम भाव.. संतती स्थान षष्ठ भाव.. शत्रू स्थान सप्तम भाव.. पत्नी स्थान अष्टमभाव.. मृत्यू स्थान नवमस्थान.. भाग्य स्थान दशम स्थान.. कर्मस्थान एकादशी स्थान.. लाभस्थान व्यय स्थान.. मोक्ष स्थान लग्नस्थान.. आपल्या जन्मावेळी पूर्वक क्षितिजावर जी रात उगवते ती रास म्हणजे लग्न रास ही पहिल्या स्थानी मांडतात या स्थानाला लग्नस्थान तनुस्थान म्हणतात आपण स्वतः आपले आरोग्य आयुष्याच्या सुरुवातीचा काळ आपले व्यक्तिमत्व आशा आकांक्षा महत्त्वाकांक्षा पहिल्या स्थानावरून समजतात मस्तकावर याचा अंमल असतो द्वितीय स्थान धनस्थान याला कुटुंब स्थान म्हणतात धनस्थान म्हणतात आर्थिक स्थिती या स्थानावरून पाहतात आयुष्यात आर्थिक दृष्ट्या उत्कर्ष होणार आहे का ? वाडवडिलांकडून काही मिळणार का ?हे या स्थानावरून समजते.. तुम्ही दिलदार आहात का चिक्कु आहात कंजूष आहात हे सुद्धा धनस्थान सांगते. उजवा डोळा वाणी वाचा खाण्यापिण्याच्या आवडी धन स्थान...

ज्योतिषशास्त्र आणि ग्रहयोग

 जन्मपत्रिकेतील काही घातक योग आपल्या जन्मपत्रिकेत मध्ये दोन ग्रहांची युती किंवा दृष्टी असेल तर काही योग निर्माण होताना दिसतात अशुभ योगाचा व्यक्तीला आयुष्यभर त्रास होताना दिसतो तर शुभयोग असता सफल  आयुष्य जगायला मिळते काही अशुभ योग पुढील प्रमाणे आहेत चांडाळ योग पत्रिकेमध्ये गुरु राहू बरोबर असता किंवा केतू बरोबर असता चांडाळ योग होताना दिसतो या योगामुळे शिक्षण घेताना धन मिळवताना अडचणी येताना दिसतात या योगामुळे कधीकधी चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात पोटाचे रोग श्वासाचे रोग दिसून येतात मोठ्या व्यक्तींच्या संदर्भात निराधार करणे अशा घटना घडून येतात हा योग निवारण करण्यासाठी उत्तम चारित्र्य ठेवावे माथ्यावर केशर हळदी किंवा चंदन याचा लेप लावावा पिवळ्या वस्तूंचे दान करावे अल्पायु योग जन्मपत्रिकेचे मध्ये चंद्र जर पापग्रह यांनी असेल किंवा त्रिक स्थानांमध्ये असेल किंवा लग्न स्थानी याची दृष्टी असेल तर जातक शक्तिहीन बनतो आणि अल्पायु योग बनताना दिसतो अल्पायु योग असता जातकाला आयुष्यात अनेक संकटांनी घेरले जाते अल्पायु योग निवारण करण्यासाठी दररोज हनुमान चालीसा महामृत्युंजय जप करावा वाईट कार्यापासू...

गुरु आणि सूर्य

 गुरु आणि सूर्य मनातले थोड शब्दांमध्ये......... काल संध्याकाळचा प्रवास करतांना खिडकीतून सहज लक्ष समोर गेल आणि त्या मावळणाऱ्या सूर्याकडे, मी बघतच राहिले...खूप विलोभनीय दृश्य होत...बऱ्याच काळात अस सुंदर दृश्य दिसण्यात नाही आलेल्.....आणि नकळत चटकन मनातून शब्द आले "Thank you" "धन्यवाद" अगदी मनापासून. अगदी त्याच्याकडे बघत बघत मनापासून त्याचे अभार मानले. त्याला म्हणाले खूप सुंदर दिवस आयुष्यात आणलेस, खुप काही दिलेस अगदी मनासारखे आणि अजूनही देतोसच आहेस तु... खरच, आपण एवढे busy आहोत का कि ह्या देवाच्या प्रत्येक निर्मितीचे एकदा तरी आभार मानायला वेळ नाहीय आपल्याकडे.  तेव्हाच पटकन मला माझ्या गुरूंची आठवण झाली. खर सांगायचे तर आपण देवाला किंवा गुरूंना किंती गृहीत धरतो ना. फक्त त्यांच्याकडे मागणे, तक्रार, दुख, राग रुसवे, बस हेच बोलणे. अडचणीच्या दिवशी इतकी आठवण काढतो किंवा नको तेवढे बोलतो कि विचारायला नको. एकदातरी आनंदी असताना कधीतरी त्यांना धन्यवाद म्हंटले का हो?  किंवा काहीच नाही तरी सहज त्यांच्याशी गप्पा मारल्यात का?  नाही ना कारण वेळच कुठेय .... आपण खूप busy असतो ना, खरय ना!...

एक सगोत्र दोष

 भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा  पिढी-गुणसुत्र आणि नातं 1) नवरा बायको --- पहिली पिढी 2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात. 3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात. 4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात. 5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात. 6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात. 7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात. 8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात. म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून  सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते.  आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं. तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात. आणि सात ...

स्वरोदय शास्त्र

 मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे म्हणून ब्रह्मांडाचे हे एक छोटे स्वरूप समजले जाते ईश्वराची आपल्यावर असीम कृपा आहे जन्मल्यापासूनच मानवाला स्वरोदयज्ञान मिळताना दिसते हेच वैज्ञानिक अध्यात्मिक ज्ञान दर्शन आहे प्राण ऊर्जा आहे विवेकयुक्त शक्ती आहे संसारातील सर्व जीवांमध्ये मनुष्य प्राणी फक्त कर्मयोगी असणार आहे बाकी सगळ्या भोगयोनी आहेत स्वर साधनेने आपल्या ऋषीमुनींनी भूत भविष्य वर्तमान काळ जाणून घेतलेला आहे मनुष्य प्राण्यांच्या हातामध्येच स्वरोदय विज्ञान याचा कसा उपयोग आणि उपभोग करून घेता येते हे अवलंबून आहे भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये अंक ज्योतिष स्वप्न ज्योतिष स्वरोदय ज्योतिष शकुन ज्योतिष सामुद्रिक हस्त शास्त्र शरीर सर्वांग लक्षण ज्योतिष आणि असे अनेक ग्रंथ आहेत या सगळ्यांमध्ये अति प्राचीन आणि तात्काळ प्रभाव देणारे परिणामकारक म्हणजे स्वरोदय विज्ञान समजले जाते मनुष्याच्या नासिकेमध्ये दोन छिद्र असतात उजवा आणि डावा परंतु केवळ एका छिद्रामधूनच वायू प्रवेश करतो आणि बाहेर निघतो त्यावेळी दुसरा बंद असतो आणि ज्यावेळी दुसऱ्या छिद्रातून वायूचा प्रवेश होतो आणि बाहेर निघतो त्या वेळेला पहिले छिद...

वास्तुशास्त्र आणि देवता

वास्तुशास्त्रात आठ दिशांना महत्व आहे आणि वस्तू हि ह्या दिशांना अनुसरूनच बांधली जाते किंवा नकाशावर रेखाटली जाते. वास्तुपूजा करताना आपण ह्या आठ दिशांच्या आठ देवतांना नमन करून त्यांची पूजा करून त्यांना घरात सुख समाधान राखण्याची विनंती करतो. वास्तू बांधताना जर ह्या आठ दिशांचे महत्व लक्षात नाही घेतले तर वस्तू मध्ये दोष उत्पन्न होऊन राहणाऱ्याला अनेक अडचणींचा आणि रोगराईचा सामना करावा लागतो. चला तर मग बघू हे आठ दिक्पाल कोण आहेत आणि त्यांच्या दिशा कोणत्या आहेत.  आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना अष्टदिक्पाल असे नाव आहे.  १. पूर्व दिशेचे अधिपती इंद्र देव आहेत. ह्यांचे वाहन ऐरावत आहे. ह्यांचे अस्त्र वज्र आहे.  २. आग्नेय दिशेचे अधिपती अग्‍नी देव आहेत. ह्यांचे वाहन मेंढा आहे. ह्यांचे अस्त्र शक्ती आहे.  ३. दक्षिण दिशेचे अधिपती यम देव आहेत. ह्यांचे वाहन महिष आहे. ह्यांचे अस्त्र पाश आणि दंड आहे.  ४. नैऋत्य दिशेचे अधिपती निर्ऋती देव आहेत. ह्यांचे वाहन पुरुष आहे. ह्यांचे अस्त्र खड आहे.  ५. पश्चिम दिशेचे अधिपती वरुण देव आहेत. ह्यांचे वाहन मकर आहे. ह्यांचे अस्त्र नागपाश आहे....

सामान्य व्यक्ती आणि शक्ती उपासक यांच्यात भेद काय ?

 सामान्य व्यक्ती आणि शक्ती उपासक यांच्यात भेद काय ? विचारसरणी मध्ये नेमका काय फरक पडतो... ?  एक उदाहरण देतो. रामायणातील शबरीची कथा सगळ्यांना माहिती आहे. त्याचा सूक्ष्म भाग सांगतो. शबरी ही मातंग ऋषींची शिष्या. मातंग ऋषी हे देवी भगवतीचे अनन्यसाधारण भक्त. त्यांच्या इच्छेमुळे भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घेतला आणि तिचा उल्लेख मातंगी देवी असा केला जातो. राजश्यामला मातंगी ही दशमहाविद्यांच्या पैकी नववी विद्या. शबरी या मातंग ऋषींची शिष्या. तिला श्रीरामांना भेटायचे होते आणि म्हणून ती मातंगांच्या आश्रमात त्यांची वाट पहात होती ही कथा आपल्याला ज्ञात आहे. नंतर तिने रामाला उष्टी बोरे खायला दिली. तिची परम भक्ती पाहून रामाने ती खाल्ली... लक्ष्मण चिडला.. हे सगळे सगळे आपल्याला माहिती आहे.  पण खरी कथा काय आहे ? आमचे उदयनाथजी महाराज आणि मी एकदा चर्चा करत होतो. मी त्यांना विचारले,” महाराज मला शबरीची कथा काही केल्या पटत नाही. मातंग ऋषींची शिष्योत्तमा, इतकी थोर शक्तीउपासक आणि तिला एक वृद्ध स्त्री आणि रामाची भक्त असे दाखवले जाते. तिने रामाला उष्टी बोरे दिली.. हे पटतच नाही.” महाराज म्हणाले,” सुजी...

मानवी मन आणि मानवी जीवनाचा एक भाग

  आयुष्यात थोडा तरी अंधार हवा. हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात.  त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं , आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे. मला आठवतं आहे , आमच्या लहानपणी इन्व्हर्टर , मोबाईल नव्हते. मेणबत्त्या , कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आईचा आवाज यायचा. "कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आईचा आवाज यायचा ..आता हळूहळू  डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा , नेणिवाचे झरे मोकळे क...

देव/देवतांची गरज का आहे?

Image
  “देव जर तटस्थ आहे आणि तो नियतीच्या योजनेत ढवळाढवळ करत नाही. तर मग देव/देवतांची गरज का आहे?” या प्रश्नावर बराच उहापोह केल्यावर, अभ्यासाअंती मला (माझ्यापुरतं) याचं उत्तर मिळाले. ते मी फक्त इथे शेअर करतो, त्यामुळे तुमचं समाधान होईल किंवा व्हायला पाहिजे असा अजिबात आग्रह नाही बरं.... देव हा माझ्यामते जर पंच (अंपायर) आहे तसाच तो मदतनीसही आहे, मार्गदर्शकही आहे आणि तो घर्षण कमी करणाऱ्या इंजिन ऑईल, ल्युब्रिकंट सारखाही आहे. तो इंजिन कुलंटचंही कधीतरी काम करतो. तो नियतीच्या कार्मिक अकाऊंटमधे ढवळाढवळ किंवा हॅकिंग न करता तुमचे हालअपेष्टा, कष्ट कमी करुन तुमचे नकारात्मक भोग सुसह्य करतो. हे मात्र माझ्यासकट असंख्य लोकांनी अनुभवलेले आहे. देवाची उपासना, स्तोत्रवाचन, पूजाअर्चा किंवा होमहवन यांनी आपल्या स्वभावातील सकारात्मकता आणि आत्मबल वाढायला मदत होते हे १००%, दैनंदिन उपासनेमुळे तुमच्या सभोवार एक विशिष्ट वलय निर्माण होते, कवच किंवा चिलखत असावे तसे ते वलय तुमचे संरक्षण करते. म्हणजे एखादा फटका/धक्का बसणं हेच जर विधिलिखित आहे तर देवाची उपासना तो धक्का न थांबवता तुमच्याभोवती संरक्षकयंत्रणा उभी करते याचा...

जगभरातील पूर्वज पूजा / स्मरण परंपरा ... आपणच अंधश्रद्ध आणि मागास???

Image
"महालय/पितृपक्ष/श्राद्ध हे सगळं भारतातच असतं. बाहेरच्या देशांत असलं काही नसतं." (थोडक्यात; आपणच अंधश्रद्ध आणि मागास आहोत आणि जग मात्र सुधारित आहे.) नाही!!!  सनातन धर्मात पितरांसाठी महालय/पितृपक्ष/श्राद्ध परंपरा आहे. अशाच प्रकारच्या पूर्वजपूजा किंवा स्मरण परंपरा जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये आहेत. खाली किमान १० उदाहरणे देतो:  जगभरातील पूर्वज पूजा / स्मरण परंपरा:  १. चीन – Qingming Festival (Tomb-Sweeping Day) एप्रिलमध्ये साजरा होतो. लोक समाधी साफ करतात, अगरबत्ती पेटवतात, अन्न, चहा, कागदी पैसा अर्पण करतात. २. जपान – Obon Festival ऑगस्टमध्ये. - असा विश्वास की पूर्वजांचे आत्मे घरी परततात. - दिवे (लँटर्न) लावले जातात, नृत्य (Bon Odori) केले जाते. ३. मेक्सिको – Día de los Muertos (Day of the Dead) नोव्हेंबरमध्ये. - लोक रंगीबेरंगी वेदिका (Ofrendas) सजवतात, मृतांसाठी त्यांना आवडणारे अन्न, पेय ठेवतात. - कॅलावेरा (साखरेच्या कवटी) प्रसिद्ध आहेत. ४. कोरिया – Chuseok शरद ऋतूमध्ये. - पूर्वजांच्या थडग्यांवर अन्न व मद्य अर्पण. - वंशज एकत्र येऊन त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. ५. व्हिएतन...

अथर्वशीर्ष म्हणजे काय?

Image
अथर्वशीर्ष म्हणजे काय? श्रीमहागणपत्यथर्वशीर्षम् ॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ नमस्ते गणपतये ॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ॥ त्वमेव केवलं कर्तासि ॥ त्वमेव केवलं धर्तासि ॥ त्वमेव केवलं हर्तासि ॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि ॥ त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥ १ ॥ ऋतं वच्मि ॥ सत्यं वच्मि ॥ २ ॥ अव त्वं माम् ॥ अव वक्तारम् ॥ अव श्रोतारम् ॥ अव दातारम् ॥ अव धातारम् ॥ अवानूचानमव शिष्यम् ॥ अव पश्चात्तात् ॥ अव पुरस्तात् ॥ अवोत्तरात्तात् ॥ अव दक्षिणात्तात् ॥ अव चोर्ध्वात्तात् ॥ अवाधरात्तात् ॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात् ॥ ३ ॥ त्वं वाग्ड़मयस्त्वं चिन्मयः ॥ त्वं आनंदमयस्त्वं ब्रम्हमयः ॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसि ॥ त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासि ॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ॥ ४ ॥ सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ॥ त्वं भूमिरापो नलो निलो नभः ॥ त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ ५ ॥ त्वं गुणत्रयातीतः ॥ त्वं देहत्रयातीतः ॥ त्वं कालत्रयातीतः ॥ त्वं मूलाधार: स्थितोसि नित्यम ॥ त्वं शक्ति त्रयात्मकः ॥ त्वां योगिनो ध्यायन्ती नित्यम ॥ त्वं ब्रम्ह...

तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ?

Image
तुला कसं कळतं ... की तू श्रीमंत आहेस ? एक अद्भुत उत्तर, एका IIT विद्यार्थ्याकडून. जेव्हा मी माझं B.Tech करत होतो, तेव्हा आमच्याकडे ‘Mechanics’ शिकवणारे एक प्राध्यापक होते. त्यांचे लेक्चर्स खूपच रंजक असायचे कारण त्यांची शिकवण्याची आणि संकल्पना समजावण्याची पद्धत वेगळीच होती. एकदा वर्गात त्यांनी काही प्रश्न विचारले: १. शून्य म्हणजे काय? २. अनंत म्हणजे काय? ३. शून्य आणि अनंत एकच असू शकतात का? आम्हाला वाटलं की आम्हाला उत्तरं माहिती आहेत आणि आम्ही म्हणालो: शून्य म्हणजे काहीच नाही. अनंत म्हणजे कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या. शून्य आणि अनंत हे विरुद्ध आहेत आणि ते कधीच सारखे होऊ शकत नाहीत. त्यांनी आम्हाला प्रतिवाद करत विचारलं – अनंत म्हणजे नेमकं काय? कोणतीही संख्या कशी काय कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते? आमच्याकडे उत्तर नव्हतं. मग त्यांनी अनंताची संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितली, जी मला आज ३५ वर्षांनंतरही आठवते. ते म्हणाले – एखादा निरक्षर मेंढपाळ आहे, ज्याला फक्त २० पर्यंत मोजता येतं अशी कल्पना करा. जर त्याच्याकडे २० पेक्षा कमी मेंढ्या असतील...

Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025

Image
  🌺 Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025 🌺 Beloved Seekers of the Divine, Kalash Sthapana (Ghatasthapana) is the most sacred beginning of Navratri worship. To invoke the Kalash at the right muhurat is to invite Maa Durga’s grace, protection, and blessings into your home. 📅 This year, Kalash Sthapana will be performed on 22nd September 2025, Monday. 🔱  Morning Auspicious Muhurat (Pratah Kaal) 🕕 6:09 AM to 8:06 AM (This is the supreme time. Establishing the Kalash in this period brings the highest blessings.) 🔱  Abhijit Muhurat 🕛 11:49 AM to 12:38 PM (If one misses the morning muhurat, the Kalash may also be established in this window.) ✨ Special Guidance ✨ This year, Navratri will be observed from 22nd September to 2nd October 2025. These Navratri will span 10 days, as Tritiya Tithi extends for 2 days. Maha Ashtami will be on 30th September 2025, and Maha Navami will be on 1st October 2025. The great festival of Vijayadashami will be celebrated on 2nd Octo...